Educational evaluation info 8

Evalution
८.सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन

१.प्रचलित मूल्यमापन पध्दतीतील त्रुटी :
१.विद्यार्थांत परीक्षेत दिलेलेल्या उत्तरावरून त्या भागाचे त्याला आकलन झाले कि नाही त्याने पाठ करून लिहिले याचा अंदाज करणे कठीण आहे.
२.मूल्यमापन करण्यासाठी चाचण्या तयार करणे व त्याच्या परीक्षा घेणे यात वेळ खूप वाया जातो .
३.मूल्यमापनासाठी चाचाण्याची प्रती व परीक्षा घेतांना प्रश्न पत्रिकेची प्रती तयार करण्यात वेळ खूप वाया जातो.
४.साहित्य हाताळणे ,एखादी वस्तू तयार करणे अशा कौशल्याचे मापन होत नाही.

२.मूल्यमापन व विद्यार्थांचा सर्वकष विकास :
१.मूल्यमापन =संख्यात्मक + गुणात्मक वर्णन +शिक्षकांने दिलेला अभिप्राय .
२.मूल्यमापन = मापन + मुल्यानिर्णय .
३.विद्यार्थांच्या ज्ञानात्मक ,भावात्मक ,क्रियात्मक असे सगळ्या बाजूने केलेले मूल्यमापन म्हणजे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय.
४.सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानातून विद्यार्थांचा सर्वकष विकास घडून येतो.
५.विद्यार्थांना सर्वांगीण गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

३.सत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाची आवश्यकता :
१.सुनागारिकत्वाची जाणीव.
२.हक्का बदल जागरुकता.
३.कर्तव्याबद्दल तत्परता.
४.समाजाच्या विकासात क्रियाशीलपणा.
५.विविध गुणांचा एकत्रीकरण .

४.सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे फायदे:
१.विद्यार्थांच्या बौद्धिक विकासाचे मापन करण्याचा धोपट मार्ग म्हणजे परीक्षा आहे .विद्यार्थांत संख्यात्मक व गुणात्मक मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
२.विद्यार्थांच्या मूल्यमापनाच्या कार्यात क्षमता पायाभूत आहेत म्हणून विद्यार्थांचे सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होणे आवश्यक आहे.
३.विद्यार्थांत अपेक्षित वर्तन बदल घडेपर्यंत मूल्यमापन करतात असे नाही कारण मूल्यमापन ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.
४.सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानामुळे विद्यार्थांचा शालेय विषयाबरोबर अनेक प्रकारच्या शालेय व सहशालेय उपक्रमातील सहभाग पाहता येतो.
५. सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानामुळे अध्ययन व अध्यापनाचा दर्जा उंचावतो व वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्यास मदत होते.
६. सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यामापानामुळे विद्यार्थात हक्काबद्दल जागृता ,कर्तव्याबद्ल तत्परता,समाजाच्या विकासात क्रियाशील सहभाग घेता येतो म्हणून त्यांच्यात विविध मूल्य व गुण घडून येतात.
५. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापनाचे तोटे:
१.पालकांची उदासीनता: पालकांना आपला मुलगा डॉ.इंजिनिअर हवा आहे अशी अपेक्षा म्हणून केवळ बौद्धिक विकासावर भर असतो.
२.पालकांचे अज्ञान : ग्रामीण व अशिक्षित पालकांना शिक्षणाचे महत्व माहिती नाही.
३.शैक्षणिक साधनांची कमतरता: खेड्यातील सर्वच शाळेत हवे ते शैक्षणीक साधन उपलब्ध नाही त्यामुळे मूल्यमापन करतांना अडचणी येतात.
४.साधनाचा अपुरा उपयोग व अपुरे ज्ञान : शिक्षकांना साधन असून सुध्दा त्याचे वापर करण्याचे तंत्र माहित नसल्यास मूल्यमापन होणे कठीण आहे.
५.अनुधावानाचा अभाव: शासकीय योजनेतील इतर शालेय कामामुळे शिक्षकांना हवा तेवढा वेळ या मूल्यमापनावर देता येत नाही .कारण सध्या महाराष्ट्रातील अनेक शाळा ह्या दोन शिक्षकी आहेत.
६समाजाचा दृष्टीकोन : समाज फक्त विद्यार्थांच्या बौद्धिक विकासाचीच तुलना करतो फक्त परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेवून कोण हुशार असे ठरवल्या जाते.
रिरिडिंग